असेही एक सीमोल्लंघन !
असेही एक सीमोल्लंघन ! काही दिवसांपूर्वी विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन हा शब्द अनेकविध दृष्टीने वाचनात आला. तेव्हाच एक विचार मनात आला, आपल्या जीवनातील अशा काही गोष्टी ज्या खरंतर आपणच आपल्याभोवती आखलेल्या सीमा आहेत. त्या सीमांची जाणीव नसते असे नाही परंतु त्या सीमांसोबत जगण्याची आपण सवय करुन घेतो. माणूस हे एक अजब रसायन आहे. भावना व विचार हे माणसाला वेगळेपण देते परंतु त्याच भावना व्यक्त करण्यासाठी माणूस अनेकदा विचार करतो. मानवी स्वभाव म्हणू वा सामाजिक दबाव, जेव्हा भावना व्यक्त करण्याची वेळ येते तेव्हा माणूस एक पाऊल मागे घेतो. अर्थात माणूस अनेकदा स्वतःच भावनांभोवती एक सीमा आखून घेतो जो नकळतपणे त्याच्या जीवनाचा एक भाग होतो. मानसशास्त्रीय दृष्टीने भावना व्यक्त न करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. संशोधनातून असे आढळून आले आहे की जेव्हा आपण आपल्या भावनांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आपण मानसिक आणि शारीरिक लक्षणे अनुभवू शकतो. आपल्या भावना दडपून ठेवणे आपल्या शरीरावरील ताणतणावासदेखील कारणीभूत ठरू शकते. भावना टाळणे देखील स्मरणशक्ती, आक्रमकता, चिंता, नैराश्य इ. अडचणी आणू शकते. मानसशास्त्रीय दृष्टीने भा